रात्री आंघोळ करावी की नाही? तोटे जाणून घ्या

असे बरेच लोक आहेत जे दररोज सकाळी आणि संध्याकाळी आंघोळ करतात. असे अनेक लोक आहेत जे रात्री झोपण्यापूर्वी थकवा घालवण्यासाठी अंघोळ करतात. अनेकांच्या मनात असाही प्रश्न असेल की रात्री आंघोळ करावी की नाही? रात्री अंघोळ करणे योग्य आहे का? नसेल तर रात्री अंघोळीचे काय तोटे होऊ शकतात.
 
1. डॉक्टरांच्या मते रात्री आपल्या शरीराचे तापमान कमी होते. रात्रीचे तापमानही कमी असते. अशा स्थितीत रात्री अंघोळ केल्याने सर्दी होण्याची शक्यता असते.
 
2. असे देखील म्हटले जाते की नेहमी रात्री आंघोळ केल्याने ताप देखील येऊ शकतो, जेव्हा तुम्ही गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराचे सामान्य तापमान बिघडते तेव्हा असे होते.
 
3. तज्ज्ञांच्या मते रात्री अंघोळ केल्याने शरीरातील चयापचय गडबड होऊ शकतो.
 
5. डॉक्टरांच्या मते रात्री अंघोळ केल्यामुळे तुमच्या पचनशक्तीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
 
6. जेव्हा चयापचय विस्कळीत होतो, तेव्हा शरीरात हार्मोन्सचे असंतुलन होण्याची शक्यता देखील वाढते.
 
7. रात्री अंघोळ केल्याने डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी आणि शरीरात जडपणा येण्याची शक्यता वाढते.
 
8. वारंवार रात्री अंघोळ केल्यामुळे छातीत दुखणे आणि स्नायू दुखणे अशी समस्याही सुरू होते, असे म्हटले जाते.
 
अस्वीकरण: औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती