बैठी कामामुळे बर्याच आजारांना आवतण मिळत असते. दुर्दैवाने बहुतांश लोकांची कामे बैठीच असतात आणि आपण किती वेळ बसून राहिलो आहे याची त्यांनाही जाणीव होत नसते. दीर्घकाळ असे एकाच जागी बसून राहिल्याने मेंदूतील रक्तपुरवठा मंदावतो. त्याचे परिणाम अतिशय घातक होऊ शकतात. यामुळे स्मृतिभ्रंशाचा धोकाही संभवतो. बैठी काम असले तरी यावरही आपण उपाय काढू शकतो. दर अर्ध्या तासाने दोन मिनिटांसाठी का होईना जर फिरून पाय मोकळे केले तरी त्याचा लाभ होऊ शकतो. अशा चालण्याने मेंदूतील रक्तसंचार सुधारतो. मेंदूत रक्तसंचार होणे ही आपल्या शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे.