या संबंधाबाबत ज्योतिषाचार्य म्हणतात की चंद्र ग्रह मनुष्याला मानसिक ताण देण्यासोबत बर्याच वेळा गुन्हेगारीत कृत्य करण्यासाठी प्रेरित करतो. याच्या प्रकोपाने जेथे नैसर्गिक संकटे निर्मित होतात, तसेच गुन्हेगारीत घटनेत वाढ होते.
तसं बघितलं तर चंद्र हा सर्वात दुर्बळ ग्रह मानला जातो. याची गती हळू असते आणि अडीच दिवसात हा राशी बदल करतो. चंद्र मनुष्याला ताण तर देतोच तसेच अप्रिय घटनांशी देखील निगडित असतो. हेच कारण आहे की पौर्णिमा आणि अमावास्यांच्या दिवशी सर्वात जास्त अनिष्टकारी घटना घटतात. याचा एकच उपाय तो म्हणजे दान आणि पूजा. म्हणून पौर्णिमा व अमावास्यांच्या दिवशी विशेष सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.