वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. 252 धावांच्या या धावसंख्येत, भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 76धावा केल्या. त्याच्याशिवाय मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने 48 आणि अक्षर पटेलने 29 धावा केल्या. केएल राहुल 34 धावा काढून नाबाद परतला आणि रवींद्र जडेजा 9 धावा काढून नाबाद परतला. भारताकडून हार्दिक पांड्यानेही 18 चेंडूत 18 धावांची खेळी केली. यासह, भारताने सातवी आयसीसी ट्रॉफी जिंकली.