सप्टेंबरपासून रेल्वे प्रवाशांना हे विमा कवच असेल. अपघात झाल्यास विमा कंपनीद्वारे उपचाराचा खर्च देण्याचीही यामध्ये तरतूद आहे. या विमा योजनेसाठी श्रीराम जनरल, रायल सुंदरम आणि आयसीआयसीआय लोंबार्ड या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या कंपन्या प्रवाशांना विमा उपलब्ध करुन देतील, अशी माहिती मनोचा यांनी दिली.