सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय- जयराम रमेश

मंगळवार, 4 जून 2024 (17:17 IST)
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून दावा केलाय की उत्तर प्रदेशातील जिल्हाधिकाऱ्यांवर मतमोजणी दरम्यान दबाव आणला जातोय.
 
त्यांनी ट्विट मध्ये म्हटलंय की, "उत्तर प्रदेशातील महाराजगंज, बांसगाव, मेरठ, मुझफ्फरनगर या जागा निवडून याव्याl यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून दबाव टाकला जातोय."
 
जयराम रमेश यांनी लिहिलंय की, "प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं की सरकार बदलत राहतं त्यामुळे लोकशाहीचा हा खेळ मान्य केला जाणार नाही." निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 4.12 पर्यंत उत्तर प्रदेशातील एकूण 80 जागांपैकी एनडीए 35, समाजवादी पार्टी 34 आणि काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती