नेपाळ पोलिसांनी ५ भारतीयांना अटक केली, बांगलादेशी नागरिकांचे अपहरण केल्याचा आरोप

गुरूवार, 29 मे 2025 (10:35 IST)
नेपाळ पोलिसांनी ५ भारतीयांना अटक केली आहे. भारतीयांवर बांगलादेशी नागरिकांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
ALSO READ: महाराष्ट्रात एका दिवसात ६६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईत ३०० हून अधिक रुग्ण सक्रिय
मिळालेल्या माहितीनुसार नेपाळ पोलिसांनी बुधवारी एका कथित अपहरण टोळीचा पर्दाफाश केला आणि ५ भारतीय नागरिकांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नेपाळमध्ये खंडणीसाठी बांगलादेशी पर्यटकांना ओलीस ठेवण्यात सहभागी होते. काठमांडू महानगर पोलिसांचे प्रवक्ते आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक अपिल बोहरा यांच्या मते, अटक केलेल्या आरोपींची ओळख  शिवा सौरभ, रमेश जाधव, दीपक कुमार, संदीप कुमार आणि जसप्रीत सिंगअशी झाली आहे.  
 
माहिती समोर आली आहे की या टोळीने स्वस्त प्रवास पॅकेजचे आमिष दाखवून नेपाळला जाणाऱ्या सात बांगलादेशी नागरिकांना अपहरण केले. काठमांडू खोऱ्यातील ललितपूर महानगरात भाड्याच्या घरात बांगलादेशी नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले होते. ओलीस ठेवलेल्या बांगलादेशी नागरिकांना मानसिक आणि शारीरिक छळही करण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक बांगलादेशी व्यक्तीकडून २०००-३,५०० अमेरिकन डॉलर्स आणि त्यांचे मोबाईल फोन लुटण्यात आले आणि त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे लाखो डॉलर्सची खंडणी मागण्यास भाग पाडण्यात आले. तसेच गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी काठमांडूच्या विविध भागातून भारतीय नागरिकांना अटक केली. काठमांडू जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना सहा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. 
ALSO READ: पालघर : प्रवाशाची हत्या केल्याच्या आरोपाखाली पालघर पोलिसांनी एका ऑटोरिक्षाचालकाला अटक केली
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: राणे कुटुंबाला महत्त्व नाही, शिवसेना यूबीटी प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती