भारत आणि पाकमध्ये शांतता आणि स्थैर्य राहावे यासाठी पाकिस्तानला भारतासह सर्व शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. यासाठी आम्ही भारताशी विनाशर्त चर्चा करण्यास तयार आहोत, असे मत पाकचे पंतप्रधान शरीफ यांनी व्यक्त केले आहे.
चर्चेदरम्यान शरीफ म्हणाले की, प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राहावे यासाठी पाकिस्तानला भारतासह सर्व शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. पाकिस्तान सर्व प्रकारच्या दहशतवादाची निर्भत्सना करतो. आम्ही देशातील दहशतवादाच्या उच्चाटनासाठी मोहीम राबवत आहोत.