Lord Krishna: भगवान श्रीकृष्णाने आपली बासरी का तोडली ?

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (18:32 IST)
Lord Krishna Flute: भगवान श्रीकृष्णाला त्यांची बासरी खूप आवडते. तो नेहमी बासरी सोबत ठेवतो. त्यांच्या बासरीचे सूर ऐकून सारे जग भक्तिमय व्हायचे. मात्र, त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्यांची बासरी तोडली. या मागचे कारण समजून घेऊया.
 
भगवान श्रीकृष्णाची बासरी हे प्रेम, आनंद आणि आकर्षणाचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या बासरीचे नाव महानंदा किंवा संमोहिनी असे होते.
 
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिवाने महर्षी दधीची यांच्या अस्थींपासून श्रीकृष्णाची बासरी निर्माण केली. जेव्हा भगवान शिव बाल कृष्णाला भेटायला आले तेव्हा ही बासरी त्यांना भेट म्हणून देण्यात आली.
 
कंसाचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण रुक्मणीशी विवाह करून द्वारकेला स्थायिक झाले. मात्र, रुक्मणीने पत्नीचा धर्म पाळला आणि सदैव भगवंताच्या सेवेत मग्न असे. पण, श्रीकृष्ण राधाला मनातून कधीच काढू शकले नाहीत.
 
असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाने आयुष्यभर आपल्या सर्व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांचा राधाशी पुन्हा संगम झाला.
 
यादरम्यान श्रीकृष्णाने राधाला काही मागायला सांगितले तेव्हा राधाने बासरी ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. बासरीचे सूर ऐकून राधाने आपला देह सोडल्याचे सांगितले जाते. भगवान कृष्णाला राधाचा वियोग सहन झाला नाही आणि त्यांनी आपली बासरी तोडून फेकून दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती