Garuda Purana गरुड पुराणातील हे उपाय आजच सुरू करा ज्यामुळे तुमचे नशीब बदलू शकते

गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (07:29 IST)
Jyotish Tips: आजकाल अनेक ज्योतिषीय उपाय आणि युक्त्या यशस्वी होण्यासाठी सांगण्यात येत आहेत. तथापि, यापैकी फारच कमी उपाय आहेत जे तुम्ही करू शकता. तसेच गरुड पुराणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे तुमचे नशीब बदलू शकते. त्यांच्याबद्दल जाणून घ्या.
 
हे नियम गरुड पुराणात नमूद केले आहेत 
माणसाने रोज सकाळी उठल्याबरोबर देवाचे दर्शन घेतले पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर जर त्याने देवाचे दर्शन घेतले तर त्याचा दिवस नक्कीच चांगला जाईल.
सकाळी घरी जेंव्हा जेंव्हा जेवण बनवायचे तेंव्हा पहिला घास किंवा पहिली पोळी बाहेर काढून गाईसाठी ठेवावी. शेवटची पोळी किंवा घास कुत्र्याला द्यावा. ज्योतिष शास्त्रानुसार देवता आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो.
जर तुम्ही घरी देवाची पूजा करत असाल तर दररोज स्वतःचे अन्न खाण्यापूर्वी देवाला अन्न अर्पण करा. लक्षात ठेवा की अन्न पूर्णपणे सात्विक असावे. त्यात अंडी, मांस, मासे, लसूण किंवा कांदा नसावा. त्यामुळे घरात आई अन्नपूर्णा वास करते.
रोज इतरांना खायला घालण्याचा नियम पाळा, मग मुंग्यांना दोन दाणे साखर घातली तरी चालेल. तुम्ही कबुतरांना धान्य किंवा गायींना हिरवा चाराही देऊ शकता. असे केल्याने सर्व ग्रहांचा अशुभ प्रभाव संपतो.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभर देवाचे आभार माना. यासोबतच येणारा उद्याचा दिवसही चांगला जावो ही प्रार्थना.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती