मराठमोळा अभिनेता सुयश टिळकच्या गाडीला अपघात, तासभर मदत मिळाली नसल्याचे म्हणाला

सोमवार, 11 ऑगस्ट 2025 (16:37 IST)
facebook suyash tilak
का रे  दुरावा मालिका फेम अभिनेता सुयश टिळक याचा गाडीचा अपघात झाला असून खुद्द अभिनेत्याने ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सुदैवाने अभिनेता अपघातातून बचावला आहे. गाडीचं नुकसान झालं आहे. 
ALSO READ: ‘बिन लग्नाची गोष्ट’ - नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास

अपघातांनंतर अभिनेत्याने 6-7 तास ट्रक मधून प्रवास करून मुंबई गाठले.माझी गाडी अशा ठिकाणी बंद पडली जिथे मला कोणाचीही मदत मिळू शकली नाही. तासाभरानंतर त्याला मदत मिळाली. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

सुयशने आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. वाहन न चालवता केलेला हा माझा सर्वात लांब प्रवास होता. थोडासा अपघात झाला, पण सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र गाडीचं इतकं नुकसान झालं की ती बंद पडली.
ALSO READ: ‘पाणी’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, प्रियांका चोप्राने आनंद व्यक्त केला
अपघात अशा ठिकाणी झाला जिथे मला कोणतीही मदत मिळत नव्हती.”“घरी जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गाडी टो करून मुंबईत आणणे. साधारण तासभर वाट पाहिल्यानंतर मदत पोहोचली. टो ड्रायव्हरनं सांगितलं की, आत बसा, गाडीला कधी मदतीची गरज भासली तर. माझी गाडी तर अक्षरशः श्वासही घेऊ शकत नव्हती! मग मी एसी नसलेल्या शांत गाडीत बसलो होतो. 6-7 तास महामार्गावरून ओढत नेलं जात होतं. रस्त्यावरचे लोक आत डोकावत होते, काहीजण हसत होते, तर काही अंदाज बांधत होते की नेमकं काय झालं असेल.”
ALSO READ: सानंदच्या रंगमंचावर वसंत कानेटकर यांचे सुर्याची पिल्ले नाटक
या प्रवासादरम्यान तो रागावू शकला असता, चिडू शकला असता, पण त्यानं संयम ठेवला. “कधी कधी आयुष्य तुमच्यासमोर जी परिस्थिती आणतं, ती तशीच स्वीकारावी लागते. मी पुस्तक वाचलं, संगीत ऐकलं, थोडा झोपलो आणि या असामान्य प्रवासाचा आनंद घेतला,” दिवसभराचा अनुभव मोबाईलमध्ये टिपून एडिट करून मिनी व्लॉग बनवला प्रेक्षकांना आनंद घेण्यासाठी. असं सुयशनं सांगितलं. 
Edited By - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती