हे भारतातील 5 सर्वात सुंदर रेल्वे मार्ग आहेत,नक्कीच आपले मन जिंकतील

शनिवार, 3 जुलै 2021 (19:26 IST)
रेल्वेचा प्रवास करणे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं.रेल्वेचा प्रवास आपल्यासाठी खास असतो.आज आम्ही अशेच सर्वात सुंदर रेल्वे मार्गबद्दल सांगत आहोत.यांचे सौंदर्य आपले मन जिंकतील.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 काश्मीर व्हॅली रेल्वे -आपल्याला आपल्या आयुष्यात एकदातरी हा रेल्वेचा प्रवास अनुभव केला पाहिजे.या प्रवासादरम्यान दिसणारे बर्फाच्छादित डोंगर हा संपूर्ण प्रवास खास बनवतात.
 

2 गोवा वास्कोडिगामा -लोंडा -आपण डोंगरावर राहता किंवा मैदानी भागात राहत असाल इथले डोंगर आणि सपाट दोन्ही प्रकारचे दृश्य बघायला मिळतील.गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या जगातील सर्वात उंच धबधबा दूधसागर मधून ही रेल्वे जाते. 
 
 
3 नीलगिरी माउंटन रेल्वे- हा क्षेत्र तमिळनाडूमधील मेटटुपालयमपासून ऊटीपर्यंत विस्तारित आहे.1908 मध्ये बनलेली ही रेल्वे निलगिरी पर्वतरांगातील सुमारे 16 बोगदे आणि 250 पुलांवरून जाते.
 

4 दार्जलिंग टॉय ट्रेन - हा रेल्वे ट्रॅक भारतातील सर्वात प्राचीन पर्वतीय रेल्वे मार्गापैकी एक आहे.हा प्रवास न्यू जलपाईगुडी पासून सुरु होतो आणि आपल्याला चहाचे बागाईत,उंच डोंगर आणि घनदाट जंगलाचे दृश्य दाखवतो.
 

5 केरळ एर्नाकुलम -कोल्लम -त्रिवेंद्रम -आपल्या नैसर्गिक सुंदरतेसाठी प्रसिद्ध रेल्वे मार्ग आपल्याला जीवनातील सर्वात चांगल्या रेल्वेच्या प्रवासाचे अनुभव देतो.ही रेल्वे प्रसिद्ध बॅक वॉटर मधून निघते याचे सौंदर्य आपल्याला पुन्हा केरळच्या प्रवासाला येण्यास भाग पाडतील.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती