ब्रेकिंग : रफाल प्रकरणी केंद्र सरकारला झटका, पुनर्विचार याचिकेवर सुनावणी होणार

बुधवार, 10 एप्रिल 2019 (11:30 IST)
रफाल प्रकरणी केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिला आहे. कोर्टानं सरकारची आक्षेप घेणारी याचिका फेटाळून लावल आहे.
 
या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं आधी दिलेला निर्णय कायम ठेवणं आणि पुनर्विचार याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली होती. जी सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे.
 
या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातल्या तीन सदस्यीत पीठापुढे सुरू आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती केएम जोशेफ या पीठाचे सदस्य आहेत.
 
सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी आधी केंद्र सरकारला क्लिन चिट दिली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती