साधूंची बाजू मांडणाऱ्या वकीलांचा अपघाती मृत्यू, भाजपची चौकशीची मागणी

शुक्रवार, 15 मे 2020 (15:54 IST)
पालघरमध्ये स्थानिकांकडून मारल्या गेलेल्या साधूंची बाजू कोर्टात मांडणारे वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा अपघाती मृत्यू झालाय. सुनावणीसाठी ते कोर्टात जात असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात ते जागीच ठार झालेत.
 
या अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे.  
 
हा अपघात म्हणजे निव्वळ योगायोग होता का, असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट करत केला आहे. तर महाराष्ट्राने ही केस CBIकडे सोपवावी अशी मागणी भाजपने केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती