मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऋषी कपूर यांच्या यांच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट

गुरूवार, 30 एप्रिल 2020 (22:09 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऋषी कपूर यांच्या यांच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट केली आहे. यामध्ये राज यांनी एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज यांनी अत्यंत ह्रद्यस्पर्शी शब्दांत ऋषी कपूर यांच्याविषयीच्या भावना फेसबूक पोस्टमध्ये मांडल्या आहेत. 
 
ऋषी कपूर ह्यांच्याशी माझा कौटुंबिक स्नेह होता. अर्थात त्यांच्या अभिनयाचा आणि स्पष्टवक्तेपणाचा मी चाहता होतो. जे मनात तेच ओठावर आणि तेच ‘ट्विटर’वर असा त्यांचा खाक्या होता. त्यांच्या एखाद्या ‘ट्वीट’वर कितीही वादंग माजलं  तरी ते मागे हटायचे नाहीत तसंच एखाद्या विषयावर भूमिका घ्यायला घाबरायचे नाहीत, असे राज यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती