वादविवादानंतरही ट्रस्टने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय कायम

बुधवार, 20 जुलै 2022 (21:32 IST)
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ आणि उत्तर महाराष्ट्रातील कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील देवीचे मंदिर मूर्ती देखभाल कामांसाठी 45 दिवस बंद करण्याचा निर्णय सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टने घेतला होता या निर्णयावर अनेक वादविवाद झाल्याचे पाहायला मिळाले या निर्णयावर आक्षेपही घेण्यात आला परंतु या वादविवादानंतरही ट्रस्टने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
21 जून पासून पुढील 45 दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय आता कायमच असल्याची माहिती मंदिर ट्रस्ट कडून मिळाली आहे. भगवती मूर्ती संवर्धन देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरू होते. सद्य:स्थितीत अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने शासनाच्या पुरातत्त्व विभाग आयआयटी पवई मुंबई मे अजिंक्यतारा कन्सल्टन्सी नाशिक यांच्यामार्फत तज्ज्ञ मार्गदर्शन प्राप्त करून भगवती मूर्ती संवर्धन व देखभालसाठी हा निर्णय घेतला आहे. गडावरील मंदिर बंद ठेवण्यासाठी अनेक विरोध झाला परंतु हा विरोध जुगारात मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
त्यामुळे आता 21 जून पासून पुढील 45 दिवस सप्तशृंगी देवीचे मंदिर येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी बंदच राहणार आहे. सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विश्वस्त संस्थेच्या वतीने भाविकांची दर्शनासाठी गडाच्या पहिल्या पायरीजवळील सप्तशृंगी देवीची हुबेहूब प्रतिकृती भाविकांच्या पर्याय दर्शनाची व्यवस्था म्हणून कार्यरत ठेवली जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती