आगामी विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा लढविणार या वादावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संघर्षाची ठिणगी पडली होती. वादामुळे आघाडीची बिघाडी होण्याचीही शक्यता होती. परंतु राष्ट्रवादीने थोडे नमते घेतले असून जागावाटप सूत्र ठरल्याचे समजते. राष्ट्रवादीला 16 जागा वाढवून देण्यास काँग्रेसने होकार दर्शवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी 130 तर काँग्रेस 158 जागांवर निवडणूक लढणार आहे.
काँग्रेस संसदीय मंडळात 115पेक्षा जास्त जागा देऊ नयेत, असा सूर निघाला. मात्र 130जागा दिल्यास आघाडी शक्य नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले जागावाटपावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब झाले.