उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटच्या तिसर्या टप्प्याचे सादरीकरण केले. शेतकर्यांना मोफत वीज देणार अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपने जागावाटपात खेचाखेची करु नये. राज्यात आघाडी विरोधी वातावरण असून महायुतीसाठी चांगले वातावरण आहे. आघाडीला सत्तेतून खाली खेचणे हाच, महायुतीचा उद्देश असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दुसरीकडे, महायुती तोडण्याबाबत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलायचे नाही, असेही उद्धव यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेनेसोबत युती तोडा अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे मत भंडारी रविवारी मांडले होते.