पहिल्या आणि दुसऱ्या मालिकेत मागे पडल्यानंतर, ज्योती आणि ऋषभ यांनी जोरदार पुनरागमन केले. चौथ्या आणि निर्णायक मालिकेत दोघांनीही सामना जिंकला, त्यानंतर भारताला सुवर्णपदक मिळाले. याआधी शुक्रवारी भारताने युरोपियन देश स्लोव्हेनियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
भारताच्या मिश्र जोडीने अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत पहिली आणि दुसरी मालिका 37-38 आणि 38-39 अशी गमावली, परंतु ज्योती आणि ऋषभ यांनी आपला उत्साह कायम ठेवला . तिसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन करताना दोघांनीही दोन 10 आणि एक इनर 10 मारले. यामुळे भारतीय जोडीने 39-38 च्या जवळच्या फरकाने विजय मिळवला.
तिसऱ्या सेटमध्ये भारताच्या विजयासह, सामना चौथ्या आणि निर्णायक टप्प्यात गेला. भारतीय तिरंदाजांनी त्यांच्या चिनी तैपेई प्रतिस्पर्धी हुआंग आय-जौ आणि चेन चिह-लुन यांच्याविरुद्ध काही उत्कृष्ट फटके मारले. निर्णायक सेटमध्ये भारतीय जोडीने 39-36 असा विजय मिळवला. एकूण धावसंख्या 153-151होती.
ही कामगिरी विशेष आहे कारण ही स्पर्धा 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. पात्रता गुणांच्या आधारे, ज्योती आणि ऋषभ यांना पाचवे मानांकन देण्यात आले. दोघांनीही पहिल्या फेरीत स्पेनला 156-149 असा पराभूत केले होते. उपांत्यपूर्व सामन्यात, भारतीय जोडीने डेन्मार्कला 156-154 अशा अटीतटीच्या सामन्यात हरवले. उपांत्य फेरीत भारतीय जोडीने स्लोव्हेनियन खेळाडूंना159-155 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.