मेरीच्या या कामगिरीमुळे आशियाई स्पर्धेतील भारताचे 'रौप्यपदक' निश्चित झाले आहे. त्यामुळे मेरीने आता सुवर्णपदक जिंकावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. मेरीने सेमीफायनलमध्ये व्हिएतनामच्या थी बांग लीचा 3-0 असा पराभव केला. दरम्यान, मेरी आतापर्यंत पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे.