दोन्ही संघांना या सामन्यात प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. सामन्याच्या सुरुवातीला जपान महिलांनी सामन्यावर वर्चस्व ठेवले होते. जपान महिलांनी दोन गोल नोंदवून भारतावर आघाडी घेतली होती. त्यानंतर तिसर्या सत्राच्या सुरुवातीला मिळालेल्या पेनल्टीच्या संधीचे सोने करत भारतीय महिला संघाने आपले खाते उघडले. राणी रामपालने भारताकडून पहिला गोल डागला. सामन्याच्या 37 व्या मिनिटाला भारताला पुन्हा एकदा पेनल्टीची संधी मिळाली. मात्र, यावेळी भारतीय महिला गोल करण्यात अपयशी ठरल्या. त्यानंतर 40 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीला ललिमाने गोलमध्ये परिवर्तित करुन भारताला जपानसोबतच्या सामन्यात बरोबरी मिळवून दिली.