या दिवशी बैलांना कामापासुन आराम असतो. शेतकरी या दिवशी बैलांना स्वच्छ धुऊन त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगांना बेगड लावतात, गळ्यात सुंदर माळा घालतात व पायात घुंगरू बांधतात. पाठीवर झुली घालून बैलांना नान तर्हांनी सजवितात. दुपारी पुरणपोळीचे जेवण करून ते बैलांना खाऊ घालतात.