स्वातंत्र्याच्या मोबदल्यात भारताचे विभाजन स्वीकारावे लागले. पण त्यानंतरही काश्मीरचा लचका पाकिस्तानने घेतलाच. तो पचवलाही आहे. त्यातला काही भाग चीनलाही देऊन टाकला. त्यानंतरही चीनने मोठा भूभाग बळकावला आहे. भारत-चीन सीमेदरम्यान सिंधू नदीपर्यंतचा भूभाग बळकावण्याचा कट चीनने आखला आहे, अशी गंभीर नोंद जम्मू-काश्मीर सरकारच्या एका अहवालात करण्यात आली आहे. त्याच हेतूने लेहच्या ईशान्येकडे असणाऱ्या डोकबुग परिसराला चीनने लक्ष्य केल्याची नोंदही या अहवालात आहे. पाकिस्तान, चीनपासून देशाला मोठा धोका केव्हाही होऊ शकतो.