छापेमारी का केली? पुरावे द्या- प्रकाश आंबेडकर

शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (09:25 IST)
एनआयएने 22 सप्टेंबर रोजी देशभरात अचानक पीएफआय या भारतविरोधी कारवाईचा आऱोप असलेल्या संघटनेवर छापेमारी करुन मोठी कारवाई केली. या छापेमारीमुळे देशभरात विविध नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
 
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही कारवाई करणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांना आव्हान दिलं आहे.
ते म्हणाले, "या धाडी आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय पुरावे होते? आणि आपण जे कागदपत्रे गोळा केलेले आहेत, ती नेमकी कोणती आहेत? त्यांच्याकडे किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या यंत्रणांनी येत्या 24 तासात लोकांसमोर मांडावं."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती