वर्धा : महाकाळी धरणात चार जण बुडाले

रविवार, 2 जुलै 2017 (09:48 IST)
वर्धा जिल्ह्यातील महाकाळी धरणात चार जण बुडाले आहेत. यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.गौरव गुल्हाणे, श्वेता नेहारे, शीतल प्रधान आणि सोनल नाईक अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.  या अपघातात एकूण 8 जण धरणावर गेले होते. सर्व जण धरणाच्या पायथ्याशी गेले होते.  यावेळी श्वेता पाण्यात उतरली. यावेळी तिचा पाय घसरला त्यावेळी तिला मदतीसाठी हात देणारे अन्य दोन जणीही बुडाले. या तिघींच्या मदतीसाठी धावलेला गौरवही धरणात बुडाला. 

वेबदुनिया वर वाचा