मागासवर्गीय असल्यानेच वानखेडेंना टार्गेट केलं जातंय- रामदास आठवले

सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (11:52 IST)
आर्यन खान प्रकरणी एका साक्षीदारानेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. विरोधकांनीही वेळोवेळी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक मोठं विधान केलं आहे.
 
वानखेडे मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केलं जातंय, असा आरोप आठवले यांनी केला आहे. समीर वानखेडे यांना संरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे. राज्यपालांना भेटून त्याबाबतची मागणी करण्यात येणार आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

"समीर वानखडे हे एक प्रामाणिक अधिकारी आहेत. गेल्या वर्षभरात समीर वानखेडे यांनी अनेक धाडी टाकून चांगली कामगिरी केली आहे. पण त्यांनी काही चुकीचं केल असेल तर त्यांच्यावर कोर्टाने ताशेरे ओढले असते," असंही आठवले यांनी म्हटलं.
 
प्रभाकर साईल या केपी गोसावीच्या बॉडीगार्डचीही चौकशी झाली पाहिजे. प्रभाकर साईल यांच्यावर जर राजकीय दबाव असेल तर त्या राजकीय दबावाचा देखील तपास पोलिसांनी करणं गरजेचं आहे, अशी मागणीही त्यांनी केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती