उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय, आता दर मंगळवारी करणार हे काम

बुधवार, 19 फेब्रुवारी 2025 (14:56 IST)
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक बंडानंतर सुरू झालेली उद्धव ठाकरेंना आलेल्या अडचणींची मालिका 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतरही सुरूच आहे. अलिकडेच, कोकणातील उद्धव यांचे विश्वासू सहकारी राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
मुंबईत असताना जितेंद्र जनावळें यांनी सोमवारी शिवसेना (यूबीटी) सोडत असल्याची घोषणा केली होती.
ALSO READ: शीतयुद्ध नाही, सगळं थंडा-थंडा कुल-कुल आहे, महाराष्ट्र सरकारमधील फुटीबद्दल एकनाथ शिंदे यांनी मौन सोडले
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून गळती सुरु आहे.हे थांबवण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीमोठा निर्णय घेतला असून  निवडणूकाच्या रिंगणात उतरण्यास सहमती दर्शवली आहे. या संदर्भात त्यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली.
ALSO READ: दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने घेतले मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय
या बैठकीत त्यांनी पक्षाला पुन्हा बळकट करण्यासाठी आणि पलायन थांबवण्यासाठी रोडमॅपवर चर्चा केली. पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी उद्धव यांनी आता दर मंगळवारी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

उद्धव ठाकरे पर्यंत अधिकाऱयांना पोहोचता येत नसणे हे पक्षाच्या गळतीचे कारण आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विचारमंथन सुरु केले आहे.
ALSO READ: जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक अभिजित पवार आणि हेमंत वाणी अजित पवारांच्या पक्षात शामिल
संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, विनायक राऊत आणि अनिल परब या नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात बैठकीत कोकणासह राज्यातील विविध प्रदेशांना भेटी देण्याचे आणि पक्षात नवीन लोकांची भरती करून पक्ष पुन्हा उभारण्याचे आश्वासन दिले.ठाकरे यांनी आता दर मंगळवारी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 
Edited By - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती