जिल्ह्यातील एटापल्ली तहसीलमध्ये 2,740 लाभार्थ्यांपैकी 1,590 कुटुंबांचे सर्वेक्षण 20 मे पर्यंत पूर्ण झाले आणि उर्वरित कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी सरकारने 31 मे पर्यंत कालावधी वाढवला आहे.
यापूर्वी घरांच्या सर्वेक्षणाचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत ठेवण्यात आला होता. परंतु काम अपेक्षित गतीने होत नसल्याने, हा कालावधी 15 मे पर्यंत वाढविण्यात आला. असे असूनही, कुटुंबांचे सर्वेक्षण प्रलंबित असल्याने, केंद्र सरकारने हा कालावधी आणखी दोन आठवड्यांनी वाढवून 31 मे ही शेवटची तारीख निश्चित केली आहे. महाआवास अॅपद्वारे ग्रामपंचायत अधिकारी आणि कुटुंबप्रमुख सर्वेक्षण करत आहेत.