राज्यपालांनी आपल्या भाषणात म्हटले की, “जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा या देशात जन्माला आला नसता तर काय झाले असते? आज मी इथे 'राधाकृष्णन' नावाने उभा आहे, तर माझे नाव दुसरे काहीतरी असू शकले असते. भारतमातेच्या आत अनेक पाकिस्तान असू शकले असते. ते (शिवाजी महाराज) एक महान योद्धा होते ज्यांनी आक्रमकांविरुद्ध लढा दिला.
ते पुढे म्हणाले, “आपण इस्लामच्या विरोधात आहोत का? नाही, ते तसं नाहीये. सगळं संपलं. आपण सर्वांना एकत्र राहायचे आहे. पण, आपण इतिहासाला त्याच्या वास्तवात समजून घेतले पाहिजे. आपल्याला सत्य जसे आहे तसे माहित असले पाहिजे. वर्षानुवर्षे संघर्ष केल्यानंतर, आज भारत हळूहळू त्याच्या प्राचीन वैभवाकडे वाटचाल करत आहे.