राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

गुरूवार, 2 जून 2022 (18:23 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहून आवाहन केलं आहे. मशिदींवरील भोंग्यांचा विषय आता कायमचा संपवायचा आहे. माझं पत्र तुम्ही राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहचवा असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला आहे. यापूर्वीच राज ठाकरे यांनी आपले पत्र जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. दशिदींवरील भोंगे हटवण्यात यावे अन्यथा त्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती. मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचे अंमलबजावणी केली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती