मान्सूनसाठी महाराष्ट्राची स्थिती पोषक आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये आज मान्सून दाखल झाला आहे.
हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. वेळेच्या पूर्वी राज्यात मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी 7 जूनच्या जवळपास मान्सूनचा राज्यात प्रवेश होतो मात्र आता 12 दिवसांपूर्वीच मान्सून राज्यात दाखल झाला आहे. पुढील काही तासांत मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
मुंबई, उपनगर, ठाणे भागात सकाळपासून वातावरण ढगाळ आहे. हवामान विभागाने आज रविवारी मुंबई, ठाणे जिल्ह्यात यलो अलर्ट तर रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मान्सूनच्या आगमनाने शेतकरी आनंदात आहे.