महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम

रविवार, 17 मे 2020 (13:44 IST)
लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. 
 
राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं होतं. लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करत असताना सरकारने इतर गोष्टींची सविस्तर माहिती दिलेली नाही. पण याआधी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार करोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही. 
 
देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती