मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १० प्रमुख निर्णयांना मान्यता देण्यात आली

मंगळवार, 17 जून 2025 (18:40 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महाराष्ट्र सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. या महत्त्वाच्या बैठकीत राज्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि उद्योगांशी संबंधित १० प्रमुख निर्णयांना मान्यता देण्यात आली.
ALSO READ: पुण्यात दारू देण्यास नकार दिल्याने तरुणाने दुकानातील कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केला
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महाराष्ट्र सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. या महत्त्वाच्या बैठकीत राज्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि उद्योगांशी संबंधित १० प्रमुख निर्णयांना मान्यता देण्यात आली. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वर आधारित कृषी धोरण, धारावी पुनर्विकास प्रकल्पाला कर सवलत, आणीबाणीच्या काळात तुरुंगात असलेल्या लोकांच्या मानधनात वाढ आणि अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण धोरणात बदल असे निर्णय समाविष्ट आहे. 
 
तसेच मंत्रिमंडळाचे हे सर्व निर्णय राज्याच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाचे मानले जातात. याचा थेट फायदा शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि सामान्य नागरिकांना होईल. हे मोठे निर्णय कोणते आहे ते जाणून घेऊया. 
कृषी क्षेत्रात नवीन एआय आधारित धोरणाला मान्यता
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला दिलासा
आदिवासी उद्योजकांसाठी औद्योगिक जमिनीचे वाटप
सार्वजनिक-खाजगी भागीदारीत ग्रोथ सेंटरला प्रोत्साहन
मुंबईतील विधी विद्यापीठाला जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे
प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जातील
मुंबई मेट्रो प्रकल्पांना आर्थिक मदत
विरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडॉरला हिरवा कंदील
एनआरआयच्या मुलांसाठी शिक्षण सुविधा
१९७५-७७ च्या आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्यप्रेमी आणि लोकशाही रक्षकांना पूर्वीपेक्षा दुप्पट मासिक मानधन
ALSO READ: नागपूरमधील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती