वरळीतील बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या पोलिसांना घरं देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात त्यांना या घरांसाठी 50 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीच यासंदर्भातील घोषणा केली आहे. या निर्णयामुळे एकीकडे पोलिस कुटुंबांमध्ये अस्वस्थता पसरलेली असतानाच, दुसरीकडे शिवसेनेसाठी देखील ही मोठी अडचण होऊन बसली आहे.