अनेक ठिकाणी पावसाचा हाहाकार

बुधवार, 6 जुलै 2022 (11:07 IST)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात 5 दिवस हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे पालघर, नाशिक, पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार  पाऊस होईलअसा अंजाद आहे. त्यामुळे 5 दिवस राज्यात सर्व ठिकाणी पाऊस पडणार आहे. 
 
तसेच मुंबईत जनजीवन विस्कळित झाले आहे, घाटकोपरमध्ये दरड कोसळली, लोकल ट्रेन आणि बससेवाही प्रभावित झाली आहे. त्याचवेळी भारतीय हवामान खात्याने सांगितले की मुंबईत शुक्रवापर्यंत पावसाची शक्यता आहे. सध्या तरी लोकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा नाही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती