आम्हीच एक क्रमांक: शेलार

मुंबईसह 10 महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उत्साहात मतदान पार पाडलं आहे. तर सर्वच ठिकाणी जास्त मतदान झालं आहे. या मतदानानंतर अॅक्सिस आणि इंडिया टुडेनं आपला एक्झिट पोल प्रसिद्ध केला आहे.त्या नुसार आम्हीच पुढे राहणार आहोत त्यामुळे आम्हीच सत्ता आणू असे भाजपचे आशिष शेलार यांनी  मत व्यक्त केले आहे. 
 
या पोलनुसार, मुंबईत भाजपला जवळजवळ 80 ते 88 जागा मिळतील तर शिवसेनेला 86 के 92 जागा मिळतील. त्यामुळे या दोन्ही पक्षात काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते. आम्हाला मुंबईत 114 जागा मिळतील असा माझा अंदाज आहे. पू्र्ण मुंबईत मतदान जास्त झालं आहे. सोसायट्यांमधून मतदार कसे बाहेर याची काळजी घेतली.

वेबदुनिया वर वाचा