गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हेराफेरीचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्या विधानामुळे देशभरात राजकीय खळबळ उडाली आहे. आता निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी शनिवारी त्यांचे दावे फेटाळून लावले आणि मतदारांकडून अनुकूल निवडणूक निकाल न मिळाल्याने निवडणूक आयोगाची बदनामी करणे पूर्णपणे मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे.
कोणीही चुकीची माहिती पसरवणे हे निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी आहे आणि या भव्य कामासाठी अथक परिश्रम करणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचवणारे आहे, असे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र मतदार यादीबाबत लावण्यात आलेले निराधार आरोप कायद्याच्या राजवटीचा अपमान असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या लेखांचे फोटो शेअर करत राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले की, निवडणूक चोरीचा हा संपूर्ण खेळ! 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लोकशाहीला धक्का देण्याचा एक ब्लूप्रिंट होता. राहुल पुढे लिहितात, हे कट कसे रचले गेले हे मी माझ्या लेखात टप्प्याटप्प्याने सविस्तरपणे सांगितले आहे.