मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षांत समारंभाच्या प्रमुख पाहुण्या असतील. त्यांच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ गुरुवार, १६ एप्रिल रोजी सकाळी ११:२५ वाजता टागोर सांस्कृतिक संकुलातील निराला सभागृहात होणार आहे.
विद्यापीठाच्या राष्ट्रपती आणि कुलपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून दीक्षांत समारंभाचे भाषण देतील. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिक्षण राज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आणि कार्यकारी परिषद सदस्य प्रा. सुरेंद्र दुबे हे दीक्षांत समारंभात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.