भाजपत गेलेल्या नेत्याला गोमुत्राने धुवून काढता की काय? अजित पवारांची टीका

मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (10:13 IST)
त्यांच्या पक्षात माणूस गेला की तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होतो. त्याचावर गोमूत्र शिंपडून त्याला आंघोळ घालतात की काय माहिती? पण इतर पक्षात गेला की त्याची चौकशी सुरू होते," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.
 
वाई शहरातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते."भाजपत गेलेल्या काहींना आमदारकी मिळाली, काहींना मंत्रिपदं मिळाली आणि त्यांच्यावरच्या चौकशाही बंद झाल्या. हे राजकारण न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही, सूज्ञ आहे त्यांना या गोष्टी कळतात," असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती