राज्यातील अमरावती येथे देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी पोटच्या दोन चिमुकल्यांचा बळी दिल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात खडीमल गावात घडली आहे. तीनशे फूट खोल दरीत मुलांना फेकून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. आज नेमका अंधश्रद्धा निर्मुलन करते नरेंद्र दाभोलकर यांची जयंती असताना महाराष्ट्रात असा प्रकार उघड झाला आहे.
आरोपी सुधाकरने मुलांना डोलारदेव बाबा जंगलातील खोल नेले. दोन्ही मुलांना उभे केले आणि मान खाली करायला लावली. दोन्ही लहानग्यांनी वडीलांचा आदेश पाळला. त्यांनी डोके जमिनीचे करताच सुधाकरने कुर्हाडीने वार करुन त्यांची अमानुष हत्या केली. या घटनेने पूर्ण राज्य हालले असून असा कोणता नवस होता याचा तपास पोलीस करत असून यामागे कोणता बाबा आहे याची महिती पोलीस मिळवत आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केला असून मनुष्यवध आणि इतर गुन्हे दाखल केले आहे.