सध्या उत्तराखण्डात ढगफुटी आणि अति मुसळधार पावसामुळे यमुनोत्रील नद्यांना पूर आला आहे. रस्ते खचले असून पूल तुटले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पर्यटक, भाविक अडकले आहे. या मध्ये 200 प्रवासी महाराष्ट्रातील आहे. अशी माहिती समोर आली आहे. पर्यटकांचे व्हिडीओ समोर आले असून ते महाराष्ट्र सरकारकडे मदतीची याचना करत आहे. सध्या मुसळधार पावसामुळे यमुनोत्रीत रेड अलर्ट जारी केले आहे.
यमुना आणि गंगा नद्यांचे जलस्तर वाढल्याने पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. देहरादून, नैनीताल, हरिद्वार, टिहरी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, चंपावत आणि उधमसिंग नगरसह अनेक जिल्ह्यांत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे