मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील थेट जनतेतून निवडा- अमोल मिटकरी

शुक्रवार, 15 जुलै 2022 (08:27 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (14 जुलै) पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार असल्याची घोषणा केली.
 
थेट लोकांमधून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडावा, असं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना जर वाटत असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील जनतेतून निवडला गेला पाहिजे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या निर्णयावर टीका केली आहे.
 
आमदार पळवून नेऊन मंत्र्यांची निवड करणंही अयोग्य आहे. त्यामुळे आता नगराध्य, सरपंच यांची थेट लोकांमधून निवड करण्याचा निर्णय अंमलात आणताना कृषी मंत्री तसंच वेगवेगळ्या खात्यांचे मंत्रीही थेट जनतेतून निवडून आणा, असा टोलाही मिटकरी यांनी लगावला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती