17 वर्षांनंतरही बसतात भूकंपाचे धक्के

वेबदुनिया

गुरूवार, 30 सप्टेंबर 2010 (14:43 IST)
लातूरमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाला आज 17 वर्ष पूर्ण झाले आहेत. 30 सप्टेंबर 1993 मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता. आज 17 वर्षांनंतरही अनेक लहान मोठे धक्के लातूर व परिसरात बसत असतात.

लातूरमध्ये झालेल्या भूकंपात चार हजारांवर नागरिकांचा बळी गेला होता, तर तब्बल सात हजार जानवरांचा यात मृत्यू झाला होता.
आजही किल्लारी व परिसरात भूकंपाच्या आठवणी ताज्या असून, अजुनही ग्रामीण भागातील लोकांना भूकंपाची धास्ती वाटते.

वेबदुनिया वर वाचा