‘युथ मुंबई’चेच पुन्हा ‘टेकऑफ’

सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (10:41 IST)
३०व्या पश्चिम विभागीय युवा महोत्सवावर मुंबई विद्यापीठाने वर्चस्व राखत पुन्हा चषकावर नाव कोरले. असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीने अजमेर येथील महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठात या महोत्सवाचे आयोजन केले होते.  महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थान येथील ३६ विद्यापीठांनी यात भाग घेतला होता. मुंबई विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी लिटरेचर, फाइन आटर्स, थिएटर, म्युझिक आणि डान्स या पाच विभागांतील स्पर्धांमध्ये विजय संपादन केला.
 
३६ विद्यापीठांमध्ये रंगलेल्या या महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने ५पैकी ४ चषक पटकावले व ८७ गुण कमवत वर्चस्व कायम राखले.

वेबदुनिया वर वाचा