जनतेच्या मागचे दुष्टचक संपावे यासाठी शिवसेनेने सत्तेत जायचा निर्णय घेतला. मात्र सत्तेत गेलो याचा अर्थ आम्ही शेपूट घातली असा कोणी घेऊ नये असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेना नसेल तर महाराष्ट्र अस्थिर होईल असेही ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, बाळासाहेब यांच्यासारखी माणसे ही आयुष्यभर मशालीसारखी जळत राहिली. समाजासाठीच त्यांनी आयुष्य वेचले. सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यात यावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.