महाराष्ट्रात नवे रेल्वेमार्ग, मुंबईत लोकलची संख्या वाढवावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. तसे निवेदन शिवसेनेच्या खासदारांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिले होते. पण, यातील कोणत्याच मागणीकडे प्रभूंनी लक्ष न दिल्याने शिवसेनेने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.