मागील आठवड्यापासून मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदवण्यात येत आहे. मुंबईचे कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले. रायगड, मालेगाव, सोलापूर, परभणी, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा या शहरांचे तापमान चाळीस अंशाच्या पुढे होते. बहुतांश शहरांचे किमान तापमान २२ ते २७ अंशाच्या घरात होते.