पीएमपीएमल, बीडीपी, वाहतुक तसेच पिण्याचे पाणी, नदी, पर्यावरण आदी प्रश्न महत्वाचे आहेत. त्याचबरोबर मेट्रोही दिल्ली दरबारी लटकलेली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा पहिलाच पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस हे पुण्यासाठी रवाना झालेले असून एका खासगी कार्यक्रमास उपस्थिती लावल्यानंतर ते अधिकाºयांची बैठक घेणार आहेत. पुण्यानंतर ते पिंपरी-चिंचवड येथेही बैठक घेऊन प्रश्न समजावून घेणार आहेत.