मुंबई महापालिकेत टँकर माफिया, पालिका अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेना नेत्यांचे लागेबांधे असून वर्षाला 500 कोटींचा घोटाळा होत असल्याचा गंभीर आऱोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मुंबईत ३० टक्के पाणीकपात करायची आणि मुंबईकरांचे पिण्याचे पाणी टॅंकरद्वारे बिल्डरांना देण्याचं काम सुरु असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.या संपूर्ण प्रकरणावर तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने महापालिका आयुक्तांची भेट घेतल्याचंही सोमय्यांनी म्हटलं आहे.