मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करुन देण्याचा दावा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केला होता. यासाठी जोरदार पाठपुरावाही केला होता मात्र, याला अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय विभागांची मंजूरी रखडल्यामुळे या निर्णयाला विलंब झाल्याचे सांगितले जात आहे.